Thursday 22 September 2022

2022 महात्मा गांधी जयंती भाषण मराठी । Mahatma Gandhi Jayanti Speech in Marathi

महात्मा गांधी भाषण मराठी - Mahatma Gandhi Jayanti Speech in Marathi : मित्रांनो भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे महात्मा गांधी देशाच्या स्वतंत्र लढ्यातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत. गांधीजींनी देशाला अहिंसेच्या मार्गाने स्वतंत्र मिळवून देण्यासाठी कार्य केले. आज भारतच नव्हे तर जगभरात गांधीजींचे अहिंसावादी विचार प्रसिद्ध आहेत. 

या लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत 2 ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती भाषण मराठी शेअर करीत आहोत. Mahatma Gandhi Speech in Marathi शाळा कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांसाठी फार उपयोगाचे आहे. तर चला महात्मा गांधी जयंतीच्या भाषणाला सुरूवात करूया...


mahatma gandhi speech in marathi

महात्मा गांधी जयंती भाषण मराठी - Mahatma Gandhi Jayanti Speech in Marathi

भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे महात्मा गांधी यांच्या जन्म 2 ऑक्टोंबर 1869 साली गुजरात राज्यातील पोरबंदर या गावी झाला. 2 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून सुद्धा ओळखला जातो. गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी व आईचे नाव पुतळाबाई असे होते. पुतळाबाई या करमचंद गांधी यांच्या चौथ्या पत्नी होत्या आणि महात्मा गांधी हे त्यांचे शेवटचे पुत्र होते. महात्मा गांधींना ब्रिटिश शासनाविरुद्ध भारतीय राष्ट्रीय आंदोलनाचे नेता व भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाते.


गांधीजींची आई पुतळाबाई अत्यंत धार्मिक प्रवृत्तीच्या स्त्री होत्या. त्यांच्या या स्वभावाचा परिणाम लहान मोहनदास यांच्यावर पडला आणि याच मूल्यांनी पुढे चालून त्यांच्या जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मोहनदास स्वभावाने अहिंसा, शाकाहार आणि विविध धर्मातील मूल्यांना मानणारे होते.       


सन 1883 मध्ये साडे तेरा वर्षाच्या वयात त्यांचे लग्न 14 वर्षाच्या कस्तुरबा यांच्याशी करण्यात आले. ज्यावेळी मोहनदास पंधरा वर्षाचे झाले तेव्हा त्यांच्या प्रथम मूल ने जन्म घेतला. परंतु काही दिवसातच त्याचा मृत्यू झाला. मोहनदास यांचे वडील करमचंद गांधी चे सुद्धा त्याच वर्षी 1885 मध्ये निधन झाले. यानंतर मोहनदास आणि कस्तुरबा यांना चार मुले झाली.


मोहनदास यांचे प्राथमिक शिक्षण पोरबंदर मध्ये तर हायस्कूल चे शिक्षण राजकोट मध्ये पूर्ण झाले. शैक्षणिक स्तरावर मोहनदास एक सामान्य विद्यार्थी होते. सन 1887 मध्ये त्यांनी मॅट्रिक ची परीक्षा अहमदाबाद हून उत्तीर्ण केली. या नंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याना लंडन जाऊन बॅरिस्टर होण्याचा सल्ला दिला. वर्ष 1888 मध्ये मोहनदास युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथे कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी व बॅरिस्टर बनण्यासाठी इंग्लंडला गेले. जून 1891 मध्ये तीन वर्षांनी गांधीजी भारतात परत आले. भारतात आल्यावर त्यांना आपल्या आईच्या मृत्यूची सूचना मिळाली. यानंतर त्यांनी बॉम्बे येथे वकिली करणे सुरू केले. सन 1893 साली दक्षिण आफ्रिकेत एका भारतीय केस ची वकिली करण्याच्या करार त्यांनी स्वीकारला. 24 वर्षाचे असताना गांधीजी दक्षिण आफ्रिकेत पोहोचले. दक्षिण आफ्रिकेत त्यांना गंभीर वंशवाद आणि नस्ल भेदाचा सामना करावा लागला. या सर्व घटना त्यांच्या जीवनात महत्त्वपूर्ण वळण बनल्या, दक्षिण आफ्रिकेत भारतीयांवर होत असलेल्या अन्यायाला पाहून त्यांच्या मनात इंग्रजीशासना अंतर्गत असलेल्या भारतीयांच्या सन्मान आणि आपली स्वतःची ओळख यासंबंधित प्रश्न उठायला लागले. यानंतर त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना राजनेतिक आणि सामाजिक अधिकार प्राप्त करणे आणि त्यासाठी संघर्ष करण्यासाठी प्रेरित केले.


वर्ष 1914 मध्ये गांधीजी भारतात परत आले. या काळात ते एक राष्ट्रवादी नेता म्हणून प्रसिद्ध होऊन गेले होते. भारतात आल्यावर त्यांनी चंपारण व खेडा सत्याग्रह, खिलाफत आंदोलन, असहयोग आंदोलन, स्वराज्य आणि मिठाचा सत्याग्रह, हरिजन आंदोलन, भारत छोडो आंदोलन असे एक न अनेक आंदोलने करून लोकांना इंग्रज शासनाविरुद्ध अहिंसेच्या मार्गाने एकत्रित केले. 9 ऑगस्ट 1942 ला गांधीजींनी भारत छोडो आंदोलन सुरू केले. भारत छोडो स्वतंत्रता आंदोलन त्या काळातील सर्वात मोठे आणि शक्तिशाली आंदोलन बनून गेले. या आंदोलनात हजारोंच्या संख्येने स्वातंत्र्यसेनानी मारले गेले. यानंतर ब्रिटीश सरकारने महात्मा गांधी समेत अनेक मोठमोठ्या काँग्रेसच्या नेतांना तुरुंगात टाकून दिले. भारत छोडो आंदोलनाचा भारतीय जनतेवर खूप मोठा परिणाम झाला. लोक संघटित होऊन गेले. यानंतर दुसरे विश्व युद्धाच्या समाप्तीपर्यंत ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य करण्याचे संकेत देऊन दिले आणि अशा पद्धतीने सर्व नेत्यांना मुक्त करत भारताला स्वातंत्र्य मिळाले.


30 जानेवारी 1948 महात्मा गांधी दिल्लीच्या बिर्ला हाऊसमध्ये एका प्रार्थनेला संबोधित करायला जात होते. संध्याकाळी 05:17 ला नाथूराम गोडसे नावाच्या एका कट्टरपंथी व्यक्तीने त्यांच्या छातीत तीन गोळ्या मारून त्यांची हत्या केली. असे मानले जाते की महात्मा गांधी यांचे शेवटचे शब्द 'हे राम' असे होते. यानंतर नाथूराम गोडसे व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला व 1949 मध्ये त्या सर्वांना मृत्यूची शिक्षा सुनावण्यात आली.

***


महात्मा गांधी भाषण मराठी - Mahatma Gandhi Speech in Marathi

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, माननीय गुरुजनवर्ग आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो. आज 2 ऑक्टोंबर म्हणजेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी जमलो आहोत. आज मी तुम्हाला महात्मा गांधी बद्दल जे काही दोन शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही विनंती.


महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर या ठिकाणी झाला. 

गांधीजींनी आपले सुरुवातीचे शिक्षण ब्रिटिश शासित भारतात पूर्ण केले. आणि नंतर उच्च शिक्षणासाठी ते लंडनला गेले. शिक्षण झाल्यानंतर ते आपल्या पत्नी कस्तुरबांसोबत दक्षिण आफ्रिकेत गेले आणि तेथे अनेक वर्षे वास्तव्य केले. त्यांनी तेथे साधे जीवन व्यतीत केले पण दक्षिण आफ्रिकेत राहणा-या भारतीयांविरुद्धच्या अन्यायाविरुद्ध लढा देण्याच्या चळवळींमध्ये ते सक्रिय राहिले.


अन्याय आणि बेकायदेशीर गोष्टींविरुद्धचा त्यांचा संघर्ष आफ्रिकेतील सविनय कायदेभंग चळवळीपासून सुरू झाला, ज्याची सुरुवात १९०६ साली झाली. तेथे भारतीयांना बेकायदेशीर कर भरण्यास भाग पाडले जात होते. चळवळीदरम्यान, दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या अनेक भारतीयांना गोळ्या घालून ठार करण्यात आले आणि अनेकांवर गंभीर अत्याचार करून त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत भारतीयांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आठ वर्षे लढा दिला. 


दक्षिण आफ्रिकेत एकदा रेल्वेने प्रवास करत असताना एका युरोपियन प्रवाशाला त्यांची जागा न दिल्यामुळे गांधीजींना फर्स्ट क्लासच्या डब्यातून बाहेर हकलण्यात आले. येथूनच त्यांच्या मनामधील स्वातंत्र्याची मशाल पेटली आणि भारताला मुक्त करण्यासाठी ते कायमचे भारतात परतले.


मायदेशी परतल्यावर त्यांनी १९१७ मध्ये चंपारण सत्याग्रहाद्वारे स्वातंत्र्याची चळवळ सुरू केली. त्यानंतर ते १९२० मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले. महात्मा गांधींचा लढा सत्याग्रह, अहिंसक चळवळ, सत्य आणि कायदेशीर लढाईने सुरू झाला.


यानंतर त्यांनी काही प्रमुख लोकांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग चळवळ, भारत छोडो आंदोलन, असहकार चळवळ अशा अनेक चळवळी सुरू केल्या. १९३० मध्ये त्यांनी दांडी यात्रा काढली, हजारो भारतीयांनी या मोहिमेत सामील होऊन सुमारे ३८५ किमी पायी प्रवास केला आणि मिठाचा सत्याग्रह केला. भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या चळवळीने लोकांना एकत्र आणले.


गांधीजींना त्यांच्या आयुष्यातील अनेक टप्प्यांवर ब्रिटिश सरकारने तुरुंगात टाकले, परंतु त्यांनी कधीही हिंसेचा मार्ग निवडला नाही, उलट दिवसभर संप आणि आमरण उपोषण करून त्यांनी त्यांचा लढा सुरू ठेवला. 


भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आणि भारतीय लोकांच्या जीवनातील गांधीजींचे योगदान निर्विवाद आहे. आपल्याला एक स्वतंत्र देश मिळवून देण्यासाठी त्यांच्या पूर्ण समर्पणाचे आपण भारतीय खरोखरच ऋणी आहोत. ब्रिटिश राजवटीच्या तावडीतून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे संघर्ष केला. त्यांच्या संघर्षाचे फळ म्हणून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यांनी हे स्वातंत्र्य हिंसाचाराने नव्हे तर अहिंसेने व शांततेच्या मार्गाने मिळवून दिले. 


२०० वर्षांच्या ब्रिटिश राजवटीत, अनेक भारतीयांनी ब्रिटीश राजवट आपले भाग्य म्हणून स्वीकारली होती आणि सर्व अयशस्वी प्रयत्नांसह स्वातंत्र्य मिळविण्याचा विचार सोडला होता. मात्र महात्मा गांधींनी भारतीय लोकांच्या हृदयात पुन्हा स्वातंत्र्याची आग पेटवली आणि भारतमातेसाठी लढण्यास प्रेरणा दिली. 


भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांच्या निखळ समर्पणाच्या पलीकडे ते उच्च मूल्यांचे व्यक्तिमत्त्वही होते. त्यांच्या जीवनातून खूप काही शिकण्यासारखे आहे. महात्मा गांधींनी खादीच्या पोशाखात आयुष्य जगत स्वतःचे कपडे कातले आणि कधीही अन्न वाया घालवले नाही. त्यांनी केवळ आपल्या जीवनातच स्वदेशी गोष्टी वापरल्या नाहीत तर भारतीयांना परदेशी कापड न वापरता स्वदेशी कापड व इतर गोष्टी वापरण्याचे आवाहन केले. खादी स्वीकारण्याच्या त्यांच्या चळवळीमुळे लोकांनी खादी वापरण्याची सुरुवात केली आणि विदेशी वस्तूंचा बहिष्कार केला. 


या व्यतिरिक्त, महात्मा गांधींनी स्वच्छतेच्या मुद्द्यांवरही लक्ष केंद्रित केले. आज आपल्या भारताच्या पंतप्रधानांनीसुद्धा बापूंची शिकवण पुढे नेण्यासाठी आणि भारतातील लोकांना स्वच्छतेची सवय लावण्यासाठी स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे.


आणखी एक गोष्ट ज्याबद्दल गांधीजीनी अगदी विलक्षण काम केले ते म्हणजे त्या काळातील अस्पृश्यांसोबत होणारी वागणूक. तथाकथित अस्पृश्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध ते कठोर होते. त्यांनीच अशा लोकांना ‘हरिजन’ म्हणून संबोधित केले आणि त्यांना देवाची मुले ही पदवी दिली. लोकांनी त्यांच्यासाठी इतर अपमानास्पद शब्द वापरू नयेत आणि त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी त्यांनी १९३३ मध्ये हरिजन, हरिजन सेवक आणि हरिजन बंधू नावाची नियतकालिके गुजराती, हिंदी आणि इंग्रजीमध्ये प्रकाशित केली.


स्वातंत्र्यानंतर, त्यांनी हिंदू-मुस्लिमांच्या ऐक्यासाठी काम केले. १५ जून २००७ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने गांधी जयंती हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन’ म्हणून घोषित केला. दरवर्षी, भारताचे पंतप्रधान प्रत्येक भारतीयात जिवंत असलेल्या त्यांच्या आत्म्याला पुष्प अर्पण करून आणि प्रार्थना करून राज घाटावर श्रद्धांजली अर्पण करतात. 


राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या अहिंसेचे आणि शांततेच्या मार्गाचे आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यात खूप मोठे योगदान असले तरी इतर स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाची उपेक्षा करता येणार नाही. अशा महान स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे आपण ऋणी आहोत. गांधी जयंती हा भारतातील लोकांना प्रेरणा देणारा आणि कोणाविरुद्धही  हिंसा न करता आपली मूल्ये जपत अन्यायाविरुद्ध लढा देण्याचा संदेश देणारा दिवस आहे. महात्मा गांधींचे जीवन आपल्यासाठी एक धडा आहे. त्यांच्या आयुष्यातून शिकणे आणि त्यांनी सांगितलेल्या मूल्यांचा आपल्या आयुष्यात समावेश करणे व दररोज त्याचा सराव करणे महत्वाचे आहे. त्यांच्या शिकवणीने मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर सारख्या अनेक महान व्यक्तींच्या जीवनावर प्रभाव टाकला आहे. मला विश्वास आहे की, त्यांच्या जीवनातून आपणसुद्धा बऱ्याच गोष्टी शिकू आणि त्यांची शिकवण पुढे घेऊन जाऊ.

धन्यवाद!

***


Mahatma Gandhi Jayanti Speech in Marathi : तर मंडळी वरील लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत 2 महात्मा गांधी जयंती भाषण शेअर केलेत. आशा आहे आपणास ही भाषणे उपयोगी ठरली असतील. Mahatma Gandhi Bhashan Marathi हे शाळा कॉलेज मध्ये होणाऱ्या भाषण स्पर्धेसाठी अत्यंत उपयोगाचे आहे. आपण या भाषणाला आपल्या पद्धतीने एडिट करून भाषणसाठी वापरू शकतात. धन्यवाद..


EmoticonEmoticon